जनसामान्यांचे नेतृत्व ठरले आरोग्यमंत्री आमदार तानाजीराव सावंत; भूम-परंडा-वाशी मतदारसंघात विकासकामांचा ठसा
लोकप्रिय लोकनेते आरोग्यमंत्री आमदार तानाजीराव सावंत यांच्या कार्याचा समर्थकांकडून गौरव; समाजकारण आणि विकासकामांची जोरदार चर्चा
धाराशिव : भूम-परंडा-वाशी मतदारसंघातील जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून आरोग्यमंत्री आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विविध विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि गरजूंसाठी केलेल्या मदतीमुळे समर्थकांकडून सावंत यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.
परंडा तालुका ‘गटकेन’ नावाच्या शिक्क्यातून बाहेर काढत विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सावंत यांनी केल्याचा दावा समर्थकांनी केला आहे. सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि.च्या माध्यमातून शेतकऱ्यांना हक्काचा साखर कारखाना उपलब्ध करून देण्यात आला. बंद पडलेले कारखाने पुन्हा सुरू करून हजारो युवकांना रोजगार देण्याचे कामही करण्यात आले.
दुष्काळ, आपत्ती, अपघात अशा संकट काळात मदतीसाठी तत्पर धावून जाणारे नेतृत्व म्हणून सावंत यांची ओळख निर्माण झाली आहे. अपघातग्रस्त कुटुंबांना आधार देणे, रुग्णालयातील बिलांमध्ये मदत करणे, पाणीटंचाईग्रस्त गावांना मोफत पाणीपुरवठा करणे, चारा छावण्या सुरू करणे अशा अनेक कामांचा उल्लेख करण्यात आला.
भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून सर्वधर्मीय विवाह सोहळे आयोजित करून हजारो युवक-युवतींचे संसार उभे करण्यात आले. महिलांना रोजगार मिळावा म्हणून उद्योग उभारणी, बचत गटांना आर्थिक मदत आणि सक्षमीकरणासाठी उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
आरोग्यमंत्री पदाच्या कार्यकाळात परंडा तालुक्यात मोठ्या आरोग्य शिबिरांचे आयोजन करून मोफत वैद्यकीय उपचार देण्यात आले. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने फिरता दवाखाना सुरू करण्याचा निर्णयही गाजला होता.
“२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण” या भूमिकेतून आरोग्यमंत्री आमदार तानाजीराव सावंत सातत्याने जनतेसाठी काम करत असल्याचा विश्वास समर्थकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच मतदारसंघात त्यांच्याबद्दल निष्ठा आणि विश्वास कायम असल्याचे चित्र दिसत आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |




















Total views : 9545