‘पंचायत समिती आपल्या दारी’ उपक्रमातून खासगाव येथे नागरिकांच्या समस्यांना मिळणार तत्काळ दिलासा
परंडा : ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी गावपातळीवरच सोडविण्याच्या उद्देशाने “पंचायत समिती आपल्या दारी” हा विशेष उपक्रम खासगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. बुधवार रोजी सकाळी ८ वाजता होणाऱ्या या उपक्रमामध्ये नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी व शासकीय कामांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लावले जाणार आहेत.
महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परंडा-वाशी तालुक्याचे भाग्यविधाते विकासरत्न कार्यसम्राट आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच तानाजीराव सावंत साहेब प्रतिष्ठानचे संस्थापक रामचंद्र घोगरे सर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता (आण्णा) साळुंखे, शिवसेना तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव, युवा सेना तालुका प्रमुख राहुल डोके, नवनाथ आप्पा जगताप आणि शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख सारिकाताई अंधारे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, त्यांच्या समस्या वेळेत सोडविल्या जाव्यात आणि शासनाच्या योजनांचा लाभ थेट गावपातळीवर मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |




















Total views : 12318