युवाशक्तीचा आवाज ठरणार जनतेचा नवा विश्वास
“नवा विचार… नवी दिशा…” या भूमिकेतून गिरीराज (भाऊ) सावंत यांची दमदार वाटचाल
धाराशिव : “युवाशक्तीचा आवाज… आपला आवाज” ही भूमिका घेऊन सामाजिक व जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने सक्रिय असलेल्या कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक सन्माननीय श्री गिरीराज (भाऊ) सावंत यांनी युवकांसाठी नवी दिशा निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “नवा विचार… नवी दिशा…” या संकल्पनेतून जनतेच्या विश्वासाची नवी ओळख निर्माण करण्यासाठी कार्यसिद्धी प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे सांगण्यात आले.
युवक, शेतकरी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत समाजकारणाला नवी ऊर्जा देण्याचे कार्य गिरीराज भाऊ सावंत यांच्या माध्यमातून सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. युवकांना सकारात्मक विचारांची दिशा देत विकासाभिमुख कार्याला गती देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकहिताचे उपक्रम राबविले जात असून, आगामी काळात युवकांच्या सहभागातून मोठे जनआंदोलन उभे करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. “जनतेच्या विश्वासाची नवी ओळख” निर्माण करण्यासाठी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करण्यावर भर राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातील पदाधिकारी, युवक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















Total views : 12798