• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, May 31, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

धाराशिवच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे शिल्पकार : डॉ. पद्मसिंह पाटील

Sayyad Musa by Sayyad Musa
May 31, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

धाराशिवच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे शिल्पकार : डॉ. पद्मसिंह पाटील

– मनोगत सिनगारे

मराठवाड्यातील जुन्या पिढीच्या आठवणींमध्ये दोन गोष्टी आजही विशेष जिवंत आहेत लातूरची प्रसिद्ध डालडा फॅक्टरी आणि बार्शी लाईट रेल्वे, म्हणजेच सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी “देवाची गाडी”. १८९७ साली सुरू झालेली ही नॅरोगेज रेल्वे सुरुवातीला बार्शी ते कुर्डूवाडी धावत होती. पुढे विस्तार होत जाऊन १९२७ पर्यंत लातूर ते मिरज असा तब्बल ३२१ किलोमीटरचा प्रवास ती करू लागली. १८९५ मध्ये पंढरपूर येथे रेल्वेस्थानक उभारल्यानंतर या रेल्वेला “देवाची गाडी” अशी ओळख मिळाली.

काळ बदलत गेला आणि आधुनिकतेच्या वाटेवर नॅरोगेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची मागणी जोर धरू लागली. मात्र या परिवर्तनामध्ये धाराशिव जिल्ह्याला एक वेगळे स्वप्न होते. रेल्वे फक्त जिल्ह्याच्या हद्दीतून जाऊ नये, तर ती जिल्हा मुख्यालयापर्यंत यावी, अशी जनतेची अपेक्षा होती. हे स्वप्न साकार करणे सोपे नव्हते. कारण मूळ मार्गावरून तब्बल १८ किलोमीटरचा वळसा घेऊन रेल्वे धाराशिव या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आणावी लागणार होती.

या संघर्षाची पार्श्वभूमी १९७२ च्या भीषण दुष्काळाशी जोडलेली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी रोजगारनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर दुष्काळी कामे सुरू केली. त्याच काळात तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी कळंब येथे आल्या आणि त्यांनी लातूर–मिरज ब्रॉडगेजसह चार रेल्वे प्रकल्पांचा उल्लेख जाहीर सभेत केला. परंतु घोषणा आणि प्रत्यक्ष मंजुरी यामध्ये तब्बल २७ वर्षांचा संघर्ष दडला होता.

या रेल्वेमार्गासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात देशातील नॅरोगेज मार्गांचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा धोरणात्मक निर्णय झाला. मात्र धाराशिव शहरापर्यंत रेल्वे आणण्याचा निर्णायक टप्पा केवळ माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांमुळेच गाठता आला ही काळया दगडावरची रेघ आहे.

धाराशिव रेल्वेमार्गाच्या मंजुरीसाठी डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ दिल्लीला गेले. त्यामध्ये तत्कालीन खासदार अरविंद कांबळे, माजी आमदार कलिमोद्दीन सिद्दिकी, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष तथा पत्रकार नंदकिशोर मंत्री, पत्रकार व्यंकटेश हंबिरे, जीवनराव गोरे, रेवणसिद्ध लामतुरे आदी मान्यवरांचा समावेश होता. या शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत असलेल्या डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी रेल्वेमंत्री जाफर शरीफ यांच्यासमोर धाराशिवच्या रेल्वेची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली.

त्यावेळी सर्वात मोठा अडथळा होता तो रेल्वे बोर्डाचा. नॅरोगेजचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करताना अतिरिक्त अंतर वाढविण्याचे कोणतेही उदाहरण नव्हते. त्यामुळे येडशी–धाराशिव हा १८ किलोमीटरचा वळसा रेल्वे बोर्डाला मान्य नव्हता. भूसंपादन आणि वाढीव खर्च ही त्यामागील प्रमुख कारणे होती. याच निर्णायक टप्प्यावर डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांनी राजकीय, प्रशासकीय आणि आपल्या राजकीय मुत्सुदिगिरीची ताकद पणाला लावली. रेल्वेमंत्री जाफर शरीफ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तत्कालीन संरक्षणमंत्री शरद पवार साहेबही उपस्थित होते. बैठकीत रेल्वे बोर्डाचे अधिकारी नकारात्मक भूमिका घेत असताना डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी हा मार्ग जिल्हा मुख्यालयाला जोडला गेल्याने भविष्यात तुळजाभवानी मातेचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर या महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्राला अधिक जवळ आणेल, असा मुद्दा ठामपणे मांडला.

देशातील रेल्वेमार्गांचे ब्रॉडगेज करताना जिल्हा मुख्यालय, पर्यटनस्थळे आणि धार्मिक स्थळे जोडण्याचा धोरणात्मक निर्णय या मांडणीमुळे अधोरेखित करण्यात आला. अंतर केवळ १८ किलोमीटरने वाढत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या प्रस्तावाला गती मिळाली. अखेर याच बैठकीत रेल्वेमार्गाला प्रशासकीय मान्यता मिळाली आणि धाराशिवच्या रेल्वे स्वप्नाला नवे पंख लाभले.

यानंतर प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण झाले. १६ फेब्रुवारी १९९३ रोजी रेल्वेमंत्री जाफर शरीफ यांच्या हस्ते लातूर–कुर्डूवाडी रेल्वे रुंदीकरणाचा शुभारंभ झाला. ३१ डिसेंबर २००३ रोजी लातूर–लातूर रोड या महत्त्वाच्या टप्प्याचे उद्घाटन झाले. अखेर २६ सप्टेंबर २००७ रोजी धाराशिव लोहमार्गाचे उद्घाटन झाले आणि १९ ऑक्टोबर २००८ रोजी पहिली लातूर–मुंबई रेल्वेगाडी धाराशिव स्थानकात दाखल झाली.

आज धाराशिव जिल्हा रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर ठळकपणे दिसतो. मुंबई, पुणे, हैदराबाद, नागपूर, नांदेड, कोल्हापूर आणि देशाच्या विविध भागांशी जोडणारा हा रेल्वेमार्ग हजारो नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. या यशामागे अनेकांचे योगदान असले तरी धाराशिव शहरापर्यंत रेल्वे आणण्यासाठी नेतृत्व, सातत्य, राजकीय इच्छाशक्ती आणि दिल्लीपर्यंत प्रभावी पाठपुरावा या सर्व बाबींचे श्रेय माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनाच द्यावे लागेल. कारण रेल्वे फक्त रुळांवर धावत नाही; ती स्वप्ने, विकास आणि एका पिढीचा संघर्ष घेऊन धावत असते. धाराशिवच्या रेल्वेच्या इतिहासात डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नाव त्यामुळे कायम अग्रक्रमाने घेतले जाईल.

Previous Post

घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक ; ४५ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Sayyad Musa

Sayyad Musa

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

धाराशिवच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे शिल्पकार : डॉ. पद्मसिंह पाटील

May 31, 2026

घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक ; ४५ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

May 31, 2026

महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार व संघटन बांधणीवर सकारात्मक चर्चा

May 30, 2026

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

May 29, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008130
Total views : 12978

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In