• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, January 23, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

पर्यटन व रोजगार टिकवण्यासाठी महामार्ग सुरक्षिततेची मागणी

Sayyad Musa by Sayyad Musa
December 11, 2025
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पर्यटन व रोजगार टिकवण्यासाठी महामार्ग सुरक्षिततेची मागणी

(ॲड. व्यंकट गुंड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना केले निवेदन)

धाराशिव, दि. — धाराशिव–बीड (सोलापूर–धुळे) राष्ट्रीय महामार्गावर अलीकडील काळात लुटमारी, चोरी, जबरी मारहाण, चेन स्नॅचिंग आणि वाहनचालकांना अडवून दहशत निर्माण करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ॲड. व्यंकट गुंड (संस्थापक – रुपामाता उद्योग समूह व प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजप) यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले.

येरमाळा ते वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही ब्लॅकस्पॉटवर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने सामान्य नागरिक, प्रवासी आणि व्यावसायिक वर्गामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. विशेषत: तुळजाभवानी माता आणि येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक या मार्गाने प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेवर लुटमारीचा परिणाम होत असून, भाविकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढीस लागल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

या भाविकांमुळे तुळजापूर, कळंब, वाशी परिसरातील हॉटेल व्यवसाय, लाँज, पर्यटन सेवा, वाहतूक, स्थानिक दुकाने आणि यात्रेवर आधारित रोजगार मोठ्या प्रमाणात टिकून आहेत. महामार्गावरील अशा घटनांमुळे भविष्यात भाविकांची संख्या कमी होण्याची शक्यता निर्माण होत असून, पर्यटन, स्थानिक व्यवसाय आणि रोजगार व्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ नये, यावर निवेदनात विशेष भर देण्यात आला.

निवेदनात ॲड. गुंड यांनी स्पष्ट केले आहे की, धाराशिव जिल्हा पोलीस प्रशासन सक्षम आहे, अनुभवी आहे आणि जिल्ह्याची कायदा-सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी सदैव तत्पर आहे. त्यामुळे महामार्गावरील सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी पोलीस विभागाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करतील, असा पूर्ण विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

महामार्ग प्रवासी, स्थानिक नागरिक व भाविकांसाठी सुरक्षित व्हावा, तसेच जिल्ह्याचे पर्यटन, अर्थकारण आणि सामाजिक जीवन अखंडपणे सुरळीत राहावे, या उद्देशाने हे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आले.

Previous Post

उपसरपंच गोविंद बर्गे नंतर धाराशिव जिल्ह्यातील आणखी एक तरुणाची कला केंद्रातील नर्तकी मुळे आत्महत्या.

Next Post

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा : आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा : आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

सातवाहन कालीन तीर्थकुंडासाठी साडेतीन कोटी. आमदार राणाजगजितसिंह  पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

कानेगाव गटातून आनंद पाटील यांनाच उमेदवारीची मागणी

January 20, 2026

कोणतेही राजकीय पाठबळ नसताना , केवळ समाजसेवेच्या भावनेतून सय्यद कलीम मुसा निवडणूक रिंगणात .

January 18, 2026

January 15, 2026

January 14, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
002673
Total views : 4449

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In