बेंबळीच्या जिल्हा परिषद मतदारसंघात मातीशी नातं जपणारा उमेदवार
➡️ विनायक शेळके यांच्या प्रचाराला जनभावनेचा ओघ .
बेंबळी | सय्यद कलीम मुसा
बेंबळी : – राजकारण केवळ सत्ता मिळवण्याचं साधन न राहता, लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचं माध्यम असावं, ही भावना सध्या बेंबळी जिल्हा परिषद मतदारसंघात ठळकपणे उमटताना दिसत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले विनायक शेळके यांचा प्रचार म्हणजे केवळ मतांची मागणी नसून, तो माणसांशी जपलेलं नातं पुन्हा उजळवण्याचा प्रयत्न असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे.
बेंबळी व भीमळी मतदारसंघातील गावभेटी दरम्यान शेळके यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत, त्यांच्या भावना शांतपणे ऐकून घेतल्या. सामाजिक कार्याच्या माध्यमातून तयार झालेली त्यांची ओळख, प्रत्येक सण-उत्सवात, विशेषतः दिवाळीसारख्या नातेसंबंध जपणाऱ्या क्षणांमध्ये लोकांसोबत उभं राहण्याची त्यांची भूमिका आज मतदारांच्या आठवणींत जिवंत असल्याचं दिसून येत आहे.
“हे नेतृत्व दूर उभं राहून फक्त आश्वासन देणारं नाही, तर आमच्यासोबत चालणारं आहे,” अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळेच विनायक शेळके यांच्याकडे सध्या एका विश्वासार्ह, संयमी आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाच्या नजरेतून पाहिलं जात आहे.
प्रचार दौर्यात गावागावातून मिळणारा वाढता प्रतिसाद हा केवळ गर्दीपुरता मर्यादित न राहता, बदलाची चाहूल देणारा असल्याचं जाणकार सांगतात. या प्रतिसादाने राजकीय वातावरणात हालचाल वाढली असून, आगामी निवडणूक लढत अधिक लक्षवेधी होण्याचे संकेत मिळत आहेत.
आचारसंहितेचे भान ठेवत, संयमित भाषेत आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवून चाललेला हा प्रचार सध्या अनेकांच्या मनात आशेची एक नवी ठिणगी पेटवत आहे. बेंबळी मतदारसंघात नेतृत्वाबाबतचा विचार केवळ राजकीय न राहता, भावनिक पातळीवर पोहोचत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.






















Total views : 5089