राजकीय भूकंप!
धाराशिव जि.प. अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील यांची लवकरच घोषणा?
“पाटील घराणे दिलेला शब्द पाळते, जे बोलते ते करते,”
धाराशिव : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीभोवती धाराशिवच्या राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू झाल्या असून सत्तेच्या समीकरणांनी वेग घेतला आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत अर्चनाताई पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात अक्षरशः “राजकीय भूकंप” झाल्याची चर्चा रंगली आहे.
जिल्हा परिषदेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याची चर्चा असून, आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव पूर्ण केल्याचा दावा पक्षांतर्गत स्तरावर केला जात आहे. त्यामुळे अध्यक्षपदाचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत असून, संभाव्य स्वागताची तयारीही सुरू झाल्याचे चित्र आहे.
या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये धाराशिव जिल्ह्यातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भूमिका निर्णायक मानली जात आहे. जिल्हा तसेच राज्य पातळीवर वाढत चाललेले त्यांचे राजकीय वजन लक्षात घेता, अध्यक्षपदाच्या समीकरणामागे त्यांची रणनीती महत्त्वाची ठरल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, युवा चेहरा म्हणून पुढे येत असलेले मल्हार राणाजगजितसिंह पाटील हेही सध्या जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचे केंद्र ठरत आहेत. भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याची कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये ऐकू येत आहे.
“पाटील घराणे दिलेला शब्द पाळते, जे बोलते ते करते,” अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. राजकीय डावपेच, कुजबुज आणि आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आता अध्यक्षपदाची अधिकृत घोषणा कधी होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
विरोधकांकडूनही पडद्यामागे हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत असले तरी, बहुमत स्पष्ट झाल्याच्या चर्चेमुळे सत्तापरिवर्तनाचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेत होऊ घातलेला हा सत्ताबदल खरोखरच नेतृत्व बदलाचे पर्व ठरणार का? आणि या निर्णयाचा जिल्ह्याच्या आगामी राजकारणावर नेमका काय परिणाम होणार? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.



















Total views : 5931