डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दारू दुकाने बंद ठेवण्याची भीम आर्मी चीं मागणी
कैलास श्रावणे
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
पुसद : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच जयंती उत्सव शांततेत पार पडावा यासाठी दारू विक्रीची सर्व दुकाने एक दिवसासाठी बंद ठेवावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात भिम आर्मी भारत एकता मिशन च्या वतीने उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जयंती दिवशी मोठ्या प्रमाणावर मिरवणुका, अभिवादन कार्यक्रम आणि समाजप्रबोधन उपक्रम राबविले जातात. अशा वेळी दारू विक्री सुरू असल्यास अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन १४ एप्रिल रोजी सर्व वाईन शॉप, बीअर बार आदी दारू विक्री केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेश संघटक अशोक भालेराव, आजाद समाज पार्टी (कां.) युवा जिल्हाध्यक्ष राजकुमार भगत, आजाद समाज पार्टी (कां.) युवा जिल्हामहासचिव विशाल डाके, अजय लोखंडे, वैभव सूर्यवंशी, राहुल धूळे,उपस्तिथ होते



















Total views : 9089