जेवळी बसवरत्न पुरस्कार – २०२६ : नामांकन जाहीर
मौजे जेवळी (ता. लोहारा) येथे सन २०२४ पासून महात्मा बसवेश्वर यात्रा कमिटी जेवळी यांच्या वतीने सुरू करण्यात आलेला “जेवळी बसवरत्न पुरस्कार – उत्सव गुणरत्नांचा, सन्मान कर्तृत्वाचा” हा अभिनव उपक्रम यंदाही उत्साहात पार पडणार आहे. बदलत्या काळानुसार आधुनिकतेची कास धरत सर्व धर्मीयांना सामावून घेणे आणि नवतरुणांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
ग्रामदैवत महात्मा बसवेश्वर यांच्या यात्रेनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षीचा पुरस्कार सोहळा दिनांक २१ एप्रिल २०२६, मंगळवार रोजी रात्री ९ वाजता, बसवमंच, बाजारपेठ, जेवळी येथे आयोजित करण्यात आला आहे. या वेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
गावकऱ्यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि आपल्या कार्यातून गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याची परंपरा जोपासली जात आहे. “मानवता हाच धर्म” या महात्मा बसवेश्वरांच्या विचारांनी प्रेरित होऊन सर्व जाती-धर्मातील व्यक्तींची निवड करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व आनंद व्यक्त केला आहे.
यंदा एकूण ७ मान्यवरांची निवड करण्यात आली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
जेवळी बसवरत्न पुरस्कार – २०२६ चे मानकरी : १) संतोष उपासे – संशोधन विभाग, पुणे
२) सुनील देशपांडे – आदर्श व्यक्तिमत्व, म्हाडा, मुंबई
३) वसंतराव पोतदार – सामाजिक कार्य, बांधकाम विभाग, लातूर
४) मल्लिनाथ सोळसे – आदर्श शिक्षक, जि.प. प्राथमिक शाळा, दस्तापूर
५) बाबा राठोड – पोलिस दलातील अतुलनीय कामगिरी, बीड
६) पांडुरंग होनाजे – आदर्श शेतकरी
७) विशाल होनाजे – आदर्श शेतकरी
या उपक्रमातून सामाजिक एकोपा, सलोखा आणि मानवतेचा संदेश दिला जात असून गावातील परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
२०२४ असून समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गुणगौरव बसव रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते ही परंपरा जोपासत जेवळी गावात स्तुत्य उपक्रम राबविले जात असल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |


















Total views : 9310